Nitin Gadkari : 40 हजार कोटींचे उत्पन्न अन् 70 लाख नोकऱ्या! काय आहे गडकरींनी दिलेला कमाईचा मंत्र? जाणून घ्या
मुंबई: ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वार्षिक बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यादरम्यान, गडकरी म्हणाले की, 'या मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिमेमुळे, फक्त सरकारी महसूल वाढणार नाही, तर जवळपास 70 लाख रोजगार निर्माण होतील. सोबतच, पाच वर्षांत जगातील नंबर 1 ऑटोमोबाईल उद्योग बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चालना मिळेल'.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कमाईचा एक नवीन मंत्र दिला आहे. सोबतच, त्यांनी ऑटो उद्योगाला एक मोठा संदेशही दिला आहे. गडकरी म्हणाले की, 'जर देशातील सर्व अयोग्य आणि प्रदूषित वाहने स्क्रॅप केल्यास भारताला जीएसटीमधून 40 हजार कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो. सोबतच, गडकरी म्हणाले की, 'या मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिमेमुळे, फक्त सरकारी महसूल वाढणार नाही, तर जवळपास 70 लाख रोजगार निर्माण होतील. सोबतच, पाच वर्षांत जगातील नंबर 1 ऑटोमोबाईल उद्योग बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चालना मिळेल'.
काय आहे स्क्रॅपिंगची विद्यमान स्थिती?
एका अहवालानुसार, सध्या स्क्रॅपिंगची विद्यमान स्थिती खूपच किरकोळ असल्याचे दिसून आले आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत, फक्त 3 लाख वाहने स्क्रॅप करण्यात आली आहेत, त्यापैकी 1.41 लाख वाहने सरकारी मालकीची होती. दर महिन्याला सरासरी 16 हजार 830 वाहने स्क्रॅप केली जात आहेत, विशेष म्हणजे, या परिसंस्थेच्या उभारणीसाठी खाजगी क्षेत्राने 2 हजार 700 कोटी रुपये गुंतवले आहेत. भारताची वाहन स्क्रॅपिंग धोरण, ज्याला व्हॉलंटरी व्हेईकल फ्लीट मॉडर्नायझेशन प्रोग्राम (V-VMP) म्हणून ओळखले जाते, जी पर्यावरण पद्धतीने जुनी, असुरक्षित आणि प्रदूषणकारी वाहने टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
एका अहवालानुसार, नवीन वाहन खरेदी करताना स्क्रॅपेज प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ग्राहकांना किमान 5% सूट देऊन स्क्रॅपिंगला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ऑटोमोबाईल उत्पादकांना आवाहन दिले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मते, स्क्रॅपेज धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केल्यास ऑटोमोबाईल पार्ट्सची किंमत 25 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, कारण पुनर्नवीनीकरण केलेले स्टील, ॲल्युमिनियम आणि साहित्य पुरवठा साखळीत परत आणले जाईल. तसेच, 97 लाख अयोग्य वाहने टप्प्याटप्प्याने बंद केल्याने उत्सर्जन कमी होईल, इंधनाचा वापर कमी होईल आणि रस्ते सुरक्षा मानके सुधारतील.
गडकरींच्या मते, भारताच्या ऑटोमोबाईल उद्योगाचा सध्याचा आकार २२ लाख कोटी रुपये आहे, तर चीनचा आकार 47 लाख कोटी रुपये आणि अमेरिकेचा 78 लाख कोटी रुपये आहे. गडकरी यांनी जाहीर केले की, 'मला विश्वास आहे की आपण पुढील पाच वर्षांत भारताचा ऑटोमोबाईल उद्योग जगात नंबर वन बनवू'.