भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, लोक जागे झाले

Earthquake in Ladakh: होळीच्या दिवशी देशात 2 ठिकाणी भूकंप; लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Earthquake

Earthquake: शुक्रवारी सकाळी लडाखमधील कारगिलमध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचे धक्के जम्मू आणि काश्मीरपर्यंत जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंप पहाटे 2:50 वाजता झाला. या भूंकपाची खोली 15 किलोमीटर होती. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, लोक जागे झाले आणि बरेच लोक घाबरून घराबाहेर पडले. तथापि, अद्याप कोणत्याही मोठ्या नुकसानीचे वृत्त नाही.

अरुणाचल प्रदेशात जाणवले भूंकपाचे धक्के -  तथापि, आज अरुणाचल प्रदेशात देखील भूंकपाचे धक्के जाणवले. हे क्षेत्र अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग येथे आहे. सकाळी 6.01 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, त्याचे केंद्र जमिनीपासून फक्त 10 किमी खोलीवर होते, त्यामुळे भूकंपाचे धक्के जास्त जाणवले.

हेही वाचा - एकतेचे रंग आणतील नवी ऊर्जा, पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा!

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर जम्मू आणि श्रीनगरमधील अनेक लोकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. अनेक वापरकर्त्यांनी लिहिले की, त्यांना जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे घराच्या खिडक्याही थरथरायला लागल्या. त्याच वेळी, काही लोकांनी याबद्दल भीती देखील व्यक्त केली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (NCS) देखील भूकंपाची पुष्टी करणारी पोस्ट सोशल मीडियावर केली.

लडाख हा भूकंप संवेदनशील भाग  - 

लेह आणि लडाख हे भारताच्या भूकंपीय क्षेत्र-IV मध्ये येत असल्याने भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानले जातात. हिमालयीन टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे या प्रदेशात वारंवार भूकंप होतात.

हेही वाचा -Tamil Rupee Symbol: केंद्र आणि तामिळनाडूमधील भाषेचा वाद वाढला! मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातून वगळले रुपयाचे चिन्ह

आसाममध्ये भूकंप - 

गेल्या महिन्यात 27 फेब्रुवारी रोजी आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात 5.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे धक्के गुवाहाटीसह अनेक भागात जाणवले.