भारताच्या कडक इशारा आणि प्रत्युत्तराच्या भीतीमुळे,

पाकिस्तानची उडाली धांदल! सीमेवरील चौक्या केल्या रिकाम्या

Pakistan evacuated its border posts प्रतिकात्मक प्रतिमा

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची भूमिका आता अधिक कडक होताना दिसत आहे. बुधवारी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांमध्ये (डीजीएमओ) हॉटलाइनवर चर्चा झाली. यावेळी, भारताने नियंत्रण रेषेवर विनाकारण झालेल्या गोळीबारावर तीव्र आक्षेप घेतला आणि भविष्यात अशा कृतींची पुनरावृत्ती केल्यास पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.

पाकिस्तान सैन्याने हटवले चौक्यांवरील झेंडे - 

भारताच्या कडक इशारा आणि प्रत्युत्तराच्या भीतीमुळे, पाकिस्तानी सैनिकांनी अनेक चौक्या रिकामी केल्या आहेत आणि त्यांचे राष्ट्रीय ध्वजही काढून टाकले आहेत. हे पाकिस्तानी सैन्याच्या भीतीचे आणि दहशतीचे प्रतीक मानले जात आहे. 

हेही वाचा - लॉरेन्स बिश्नोई गँगची पाकिस्तानला धमकी

नापाक कारवायांनंतर भारताचा पाकिस्तानला कडक इशारा - 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. भारतीय सैन्याने प्रत्येक वेळी योग्य उत्तर दिले आहे, परंतु आता सरकारने स्पष्ट केले आहे की, प्रत्येक हल्ल्याची किंमत मोजावी लागेल. भारत आता केवळ लष्करी ताकदीनेच नव्हे तर राजनैतिक आणि पाण्याशी संबंधित रणनीतींनीही पाकिस्तानला घेरण्याची तयारी करत आहे.

हेही वाचा - अटारी सीमेवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा गैरवर्तन; 2 तास उघडले नाही इमिग्रेशन गेट

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तीन उच्चस्तरीय बैठकांचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकांमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि भारताच्या भविष्यातील रणनीतीवर विचार करण्यात आला.