'70 तास काम करण्याचा सल्ला देण्याच्या' नारायण मूर्तींच्या विधानावर सुधा मूर्तींनी दिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? जाणून घ्या
सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती यांच्या 70 तास काम करण्याच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. सुधा मुर्ती यांनी म्हटलं आहे की, 'जेव्हा कोणतेही काम उत्कटतेने आणि समर्पणाने केले जाते तेव्हा वेळेची मर्यादा काही फरक पडत नाही. इन्फोसिससारखी कंपनी उभारणे ही जादू नव्हती तर ती नारायण मूर्ती यांच्या कठोर परिश्रमाचे, योग्य टीमचे आणि वेळेच्या योग्य वापराचे परिणाम होती.' तथापी, सुधा मूर्ती यांनी म्हटलं आहे की, त्यांनी स्वतः कुटुंबाची जबाबदारी घेतली, जेणेकरून नारायण मूर्ती त्यांच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करू शकेल.
सुधा मुर्ती यांनी पुढे म्हटलं आहे की, नारायण मूर्ती यांचे विधान हे फक्त आयटीपुरते मर्यादित नाही. डॉक्टर, पत्रकार यांसारख्या व्यवसायांमध्येही जास्त वेळ काम करतात, ही प्राधान्याची आणि आवडीची बाब आहे. जर एखाद्याला त्याचे काम आवडत असेल तर 70 किंवा 90 तासही ओझे वाटणार नाहीत. पण हे प्रत्येकासाठी आवश्यक नाही, असंही सुधा मूर्ती यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - Narayana Murthy On AI: ''एआयबद्दल अतिशयोक्ती करणे थांबवा''; नारायण मूर्ती यांनी असं का म्हटलं?
सुधा मूर्ती यांचा असा विश्वास आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपला वेळ कसा वापरायचा याची स्वतःची निवड असते. काहींना काम आणि जीवनाचा समतोल हवा असतो तर काहींना त्यांच्या करिअरला प्राधान्य द्यायचे असते. सोशल मीडियावर सुरू झालेल्या वादात दोन बाजू स्पष्टपणे दिसून येतात. एका बाजूला असे लोक आहेत जे काम-जीवन संतुलन आणि मानसिक आरोग्याचे समर्थन करतात आणि दुसऱ्या बाजूला असे लोक आहेत जे देशाला पुढे नेण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे असे मानतात.
सुधा मूर्ती यांचे उत्तर नारायण मूर्तींच्या दृष्टिकोनातून या वादाला बळकटी देते. परंतु त्यामुळे असा प्रश्नही उपस्थित होतो की प्रत्येकाकडून अशा कठोर परिश्रमाची अपेक्षा करावी का? विशेषतः जेव्हा बहुतेक लोक नारायण मूर्तींसारखे कंपनीचे मालक नसतात, तर असे कर्मचारी असतात ज्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाच्या बदल्यात मर्यादित फायदे मिळतात. भारतातील कामाच्या वेळेवरील वादविवाद संपत नाहीयेत. काही जण 70 तासांचे समर्थन करतात तर काही 80-90 तासांचे समर्थन करतात. काही दिवसांपूर्वी नीति आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी देखील कामाच्या वेळेबद्दल विधान केलं होतं.