महाराष्ट्रात सकाळी ११ वाजेपर्यंत १८ टक्के मतदान
मुंबई : सकाळी ११ वाजेपर्यंत महाराष्ट्रात १८. १४ टक्के तर झारखंडमध्ये ३१.३७ टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ३० टक्के तर नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी १३.६७ टक्के मतदान झाले. मतदारांनो घराबाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजावा; असे आवाहन सर्वपक्षीय उमेदवारांनी केले आहे. राज्यात विधानसभेसाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात सकाळी ११ वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान ?
अहमदनगर - १८.२४ अकोला - १६.३५ अमरावती - १७.४५ औरंगाबाद - १८.९८ बीड - १७.४१ भंडारा - १९.४४ बुलढाणा - १९.२३ चंद्रपूर - २१.५० धुळे - २०.११ गडचिरोली - ३०.०० गोंदिया - २३.३२ हिंगोली - १९.२० जळगाव - १५.६२ जालना - २१.२९ कोल्हापूर - २०.५९ लातूर - १८.५५ मुंबई शहर - १५.७८ मुंबई उपनगर - १७.९९ नागपूर - १८.९० नांदेड - १३.६७ नंदुरबार - २१.६० नाशिक - १८.७१ उस्मानाबाद - १७.०७ पालघर - १९.४० परभणी - १८.४९ पुणे - १५.६४ रायगड - २०.४० रत्नागिरी - २२.९३ सांगली - १८.५५ सातारा - १८.७२ सिंधुदुर्ग - २०.९१ सोलापूर - १५.६४ ठाणे - १६.६३ वर्धा - १८.८६ वाशिम - १६.२२ यवतमाळ - १९.३८