काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, लोकम

'काँग्रेसने वारंवार बाबासाहेबांचा अपमान केला'

manoj teli

अमरावती : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी काँग्रेस पक्षावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान केल्याचा आरोप केला आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले की, काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याचे काम कधीच केले नाही.

योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारशाचे कौतुक करत महाराष्ट्रातील भूमीला नमन केले. त्यांनी महायुतीला “श्रेष्ठ भारताच्या भल्यासाठी” कार्यरत असे सांगितले, तर महाविकास आघाडीला भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे आणि राष्ट्रीय सुरक्षेसोबत तडजोड करणारे "महाअनाडी गठबंधन" असे संबोधले.

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम 370 हटवून काश्मीरमधील दहशतवादाचे मुळ तोडल्याचेही सांगितले. शिवाय, अयोध्येत राम मंदिर उभारणे, गोहत्याबंदी, आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांना सन्मान देणे हे मोदी सरकारच्या कार्याचा भाग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

योगी आदित्यनाथ यांनी “आता पाकिस्तान भारतात घुसण्याचा विचार करू शकत नाही” असे सांगून मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची सुरक्षा अधिक मजबूत झाली असल्याचे सांगितले.