Lalbaugcha Raja Visarjan Update: भरतीमुळे लालबागच्या राजाचे विसर्जन आणखी काही तासांनी; स्वयंचलित तराफ्यावर गणेशमूर्ती विराजमान
मुंबई : मुंबईतील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गणपती 'लालबागचा राजा' यांचे विसर्जन (lalbaugcha raja ganpati visarjan) लवकरच होण्याची अपेक्षा आहे. यावर्षी त्यांचा पंडाल भगवान तिरुपती बालाजीच्या थीमवर सजवण्यात आला होता. लालबागचा राजाचे हे 92 वे वर्ष आहे.
समुद्राच्या उसळत्या लाटांमुळे मुंबईतील प्रसिद्ध गणेश पंडाल 'लालबागचा राजा' म्हणजेच 'लालबागचा राजा' यांचे विसर्जन ((lalbaugcha raja 2025 visarjan) यावेळी झालेले नाही. रविवारी सकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटीवर पोहोचलेली बाप्पाची विशाल मूर्ती रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत समुद्रात विसर्जित झालेली नाही. लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी विसर्जनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोळी बांधवांशी झालेल्या चर्चेनुसार रात्री साडेदहा नंतर विसर्जन होईल, असं ते म्हणाले.
यावर्षी लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी एक विशेष स्वयंचलित तराफा तयार करण्यात आला आहे. लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी उद्योजक अनंत अंबानी देखील उपस्थित होते. लालबागचा राजाच्या गणपतीच्या मूर्तीला तराफ्यावर विराजमान करण्यात यश आलं आहे. अत्याधुनिक तराफ्यावर लालबागचा राजा विराजमान झाल्यानंतर मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी संवाद साधला. रात्री साडे दहा ते अकरानंतर विसर्जन होऊ शकतं, अशी माहिती सुधीर साळवी यांनी दिली. लालबागच्या राजावर करोडो भाविकांची श्रद्धा असल्यानं सकाळी विसर्जनाचा एक प्रयत्न करण्यात आला. मात्र, समुद्राला भरती असल्याने तो थांबवल्याचं ते म्हणाले. यावेळी साळवी यांनी माध्यमांचे आभार मानले.
लालबागचा राजा मंडळाचे सुधीर साळवी यांनी माहिती दिली मुंबईत पडत असलेला पाऊस आणि अरबी समुद्राची भौगौलिक परिस्थिती पाहता यावेळी अरबी समुद्राला भरती लवकर आली. लालबागच्या राजाच्या गणपतीचं विसर्जन भरती आणि ओहोटीवर अवलंबून असते. आम्ही इथं पोहोचायच्या अगोदर भरती आली होती. आम्ही एक प्रयत्न करुन बघितला, लालबागचा राजा करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळं तो प्रयत्न थांबवला, असं सुधीर साळवी म्हणाले. ओहोटीच्या वेळी लालबागचा राजा तराफ्यावर घेतला जातो. भरती आल्यावर तराफा अरबी समुद्रात जातो आणि त्यावेळी त्या ठिकाणी गणपतीचे विसर्जन होते. लालबागचा राजा मंडळाकडून उशिरा होत असलेल्या विसर्जनामुळं दिलगिरी व्यक्त करतो. मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांचं आभार मानतो. भरती लवकर आली आणि 10 ते 15 मिनिटं उशिरा पोहोचलो. माध्यमे आमच्या पाठिशी उभी राहिली. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो, असं सुधीर साळवी म्हणाले.
लालबागच्या राजाचे अद्याप विसर्जन होऊ शकले नसल्याबदद्ल साळवी यांनी दिलगिरी व्यक्त केली. लालबागचा राजा करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असल्यानं आम्ही गणपतीचं शास्त्रोक्त पद्धतीनं विसर्जन करणार आहोत. आता ही जी भरती आहे ते पाहता आणि कोळी बांधवांशी संवाद साधला, त्यानुसार रात्री साडे दहा ते अकरा वाजता विसर्जनासाठी लालबागचा राजा मार्गक्रमण करेल. आम्हा कार्यकर्त्यांसाठी हा क्षण वेगळ्या पद्धतीचा आहे, असं सुधीर साळवी म्हणाले.
मुंबईत दोन दिवस तुफान पाऊस पडतोय आणि भरती लवकर आली. त्यामुळं विसर्जनाची वेळ जुळली नाही. यामुळं विसर्जन थांबवण्याचा निर्णय घेतला. आज रात्रीपर्यंत विसर्जन पार पाडू, असे सुधीर साळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मंडळासमोर नवं आव्हान अत्याधुनिक तराफ्यावर लालबागच्या राज्याची मूर्ती चढवण्यात समुद्राला भरती आल्यानं पाणी वाढल्यानं सकाळपासून अडचणी येत होत्या. अखेर गणेशभक्तांच्या प्रार्थनेला यश आलं आहे, लालबागच्या राजाची मूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यात यश आलं आहे. समुद्राचं पाणी ओसरल्यानंतर मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश आलं आहे. मात्र, आता मंडळासमोर नवं आव्हान आहे. अत्याधुनिक तराफा जिथं आहे तिथं सध्या समुद्राचं पाणी नाही. तराफ्याची हालचाल कशी करायची असं नवं आव्हान मंडळासमोर आहे. जेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल तेव्हा तराफ्याची हालचाल करता येणं शक्य होईल. सध्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत ओहोटीची वेळ असल्यानं तोपर्यंत वाट पाहावी लागेल.
दरम्यान, दुपारी तीननंतर ओहोटीस सुरुवात झाली आहे. तरीही लालबागच्या राजाच्या विसर्जनाला आणखी काही तास लागणार आहेत. लालबागचा राजा हे लोकांचे आवडते आराध्य दैवत असल्याने अजूनही गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी आहे. यादरम्यानच अन्य मंडळांच्या गणेशमूर्तींचेही विसर्जन सुरू आहे.