साईभक्तांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता साक्

देशभरातील विविध शहरांमध्ये होणार साईबाबांच्या मुळ चरण पादुका दर्शनासाठी उपलब्ध

साईभक्तांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. साईबाबांच्या मूळ 'चरण पादुका' देशभरातील विविध शहरांमध्ये दर्शनासाठी लवकरच उपलब्ध करणार आहेत. हा निर्णय शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. देशभरातील साईभक्त लाखोंच्या संख्येने साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. मात्र, आता साक्षात साईबाबांच्या मूळ चरण पादुका देशभरातील विविध राज्यांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत.

 

हेही वाचा: एका गाभाऱ्यात दोन गणपती; पद्मालयचा अद्भुत चमत्कार, जाणून घ्या..

 

'या' ठिकाणी होणार दर्शन सोहळा:

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांतील आठ शहरांमध्ये या पादुकांचा दर्शनासाठी उपलब्धता असेल.

10 एप्रिल 2025 ते 13 एप्रिल 2025 दरम्यान महाराष्ट्रातील सांगली शहर आणि सांगली जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे भाविकांच्या दर्शनासाठी साईबाबांच्या मूळ चरण पादुका उपलब्ध असणार आहेत.

14 एप्रिल 2025 ते १८ एप्रिल 2025 दरम्यान कर्नाटकातील दावणगेरे आणि मल्लेश्वरम येथे पाच दिवस साईबाबांच्या मूळ चरण पादुका दर्शनासाठी उपलब्ध असतील.

19 ते 25 एप्रिल पर्यंत तामिळनाडू राज्यातील सेलम, करूर, पुलीयमपट्टी आणि धर्मपुरी याठिकाणी साईबाबांच्या मूळ चरण पादुका भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत.

त्यानंतर 26 एप्रिल 2025 रोजी धर्मपुरी याठिकाणी असलेल्या साईबाबांच्या मूळ चरण पादुका पुन्हा शिर्डीकडे रवाना होतील.

 

तब्बल एवढ्या किलोमीटरचा असणार 'हा' दौरा:

मूळ चरण पादुकांचा हा दौरा तब्बल 2776 किलोमीटरचा असणार आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान आणि स्थानिक आयोजन समिती यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दर्शन सोहळ्यादरम्यान स्थानिक आयोजन समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, त्याच ठिकाणी साईबाबांच्या मूळ चरण पादुका ठेवण्यात येणार आहेत. या पादुका कोणत्याही भाविकांच्या घरी नेण्यात येणार नाहीत. या सोहळ्यादरम्यान, शिर्डीतील साईबाबा संस्थानचे अधिकारी, सुरक्षारक्षक, आणि त्यासोबतच साई मंदिरातील पुजारी असे एकूण 20 कर्मचारी या पादुका सोहळ्यामध्ये सहभागी असणार आहेत.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)