Indian Flag Revolution: 1906 ते 1947 जाणून घ्या राष्ट्रध्वजाचा गौरवशाली इतिहास
15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन. या दिवसाचा एक वेगळाच उत्साह भारतीयाच्या चेहऱ्यावर दिसून येतो. भारतीय राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावला जातो. पण भारतीय राष्ट्रध्वज म्हणजे केवळ तीन रंगांचा कापडाचा तुकडा नाही, तर तो आपल्या देशाच्या अस्मितेचं, स्वातंत्र्याचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे. आज आपण ज्याला अभिमानाने "तिरंगा" म्हणतो, त्या राष्ट्रध्वजामागे एक समृद्ध आणि संघर्षमय इतिहास दडलेला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पहिला ध्वज: भारताचा पहिला ध्वज 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाता येथील पारसी बागान चौकात फडकवण्यात आला. या ध्वजावर लाल, पिवळा आणि हिरवा अशा तीन आडव्या पट्ट्या दिसून येतात.
दुसरा ध्वज: 22 ऑगस्ट 1907 रोजी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत मॅडम भिकाईजी कामा यांनी भारताचा दुसरा ध्वज फडकावला. या ध्वजात सूर्य आणि चंद्राचीही चित्रे होती.
तिसरा ध्वज: 1917 मध्ये, होमरूल चळवळीदरम्यान डॉ. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी तिसरा ध्वज फडकावला. या ध्वजावर लाल आणि हिरव्या रंगाचे पट्टे होते आणि वर युनियन जॅक होता.
चौथा ध्वज: हा ध्वज 1921 मध्ये फडकवला होता. विशेष म्हणजे, हा ध्वज पांढरा, हिरवा आणि लाल रंगाचा होता. त्यासोबतच, मध्यभागी एका चरख्याचे चित्र होते. चौथ्या ध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती.
पाचवा ध्वज: 1931 मध्ये काँग्रेसने हा ध्वज स्वीकारला. विशेषत: ध्वजाच्या वरच्या बाजूला केशरी रंग मध्यभागी पांढरा रंग आणि खालच्या बाजूला हिरवा रंग होता.
विद्यमान ध्वज: अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, 22 जुलै 1947 रोजी विद्यमान राष्ट्रध्वजाला भारतीय संविधान सभेने स्वीकार केले. विशेष बाब म्हणजे, या ध्वजात चरख्याच्या जागी अशोक चक्र दर्शवण्यात आले. या ध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती.