श्रावण महिन्यात भगवान शंकराला पूजेत कमळ, केवडा, चा

SHRAVAN 2025: श्रावणात ‘ही’ फुले चुकूनही महादेवाला अर्पण करू नका, अन्यथा होईल प्रकोप

SHRAVAN 2025: श्रावण महिना म्हणजे शिवभक्तांसाठी अतिशय पवित्र आणि महत्वाचा कालावधी. वर्षातील चार महिन्यांपैकी श्रावण महिना हा विशेष मानला जातो, कारण याकाळात भगवान शिवाची आराधना केली की इच्छित फल मिळते असा दृढ विश्वास आहे. प्रत्येक सोमवार पवित्र मानून भक्त महादेवाची उपासना, व्रत आणि अभिषेक करतात. मात्र, जितके पूजेसाठी काही फुले आणि वस्तू शुभ मानल्या जातात, तितक्याच काही वस्तू अशुभ मानल्या जातात आणि त्या महादेवाला अर्पण केल्यास त्याचा प्रकोप ओढवू शकतो.

महादेवाला प्रिय असलेल्या वस्तू

भगवान शंकराला बेलपत्र, दुध, भस्म, गंगाजल, आकड्याचे फुल, धतुरा, विलोच्या फांद्या आणि पांढरी फुले अत्यंत प्रिय आहेत. हे सर्व घटक पूजेमध्ये समाविष्ट केल्यास महादेव प्रसन्न होतात आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात. विशेषतः बेलपत्र शिवपूजेचे अत्यंत आवश्यक अंग मानले जाते.

पण ‘ही’ फुले महादेवाला नकोच

धार्मिक शास्त्रानुसार, काही विशिष्ट फुलं आहेत जी महादेवाला अत्यंत अप्रिय आहेत आणि ती चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नयेत. यामध्ये मुख्यतः कमळ, केवडा आणि चाफा यांचा समावेश होतो. कमळाचे फूल हे विशेषतः विष्णू आणि लक्ष्मी देवीला अर्पण करण्यासाठी वापरले जाते. म्हणूनच शिवपूजेत त्याचा वापर वर्ज्य मानला गेला आहे. केवडा आणि चाफा या दोन्ही फुलांना पौराणिक कथेनुसार भगवान शंकराचा शाप मिळालेला आहे. त्यामुळे ती फुले अर्पण केल्यास पूजा निष्फळ ठरते, असे मानले जाते.लाल रंगाची फुले, विशेषतः जास्वंद, या देवी व विष्णूला प्रिय असल्यामुळे, ती देखील महादेवाला अर्पण करणे टाळावे.

हेही वाचा: Weekly Horoscope july 13 to july 19: ग्रहांची चाल बदलणार नशिबाची दिशा? जाणून घ्या तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

काटेरी फुलांपासूनही रहा दूर

धतुर्याचा अपवाद वगळता इतर कोणत्याही काटेरी फुलांचा शिवपूजेत वापर टाळावा. धतुरा हे फुल शंकराला विशेष प्रिय मानले गेले आहे, पण इतर कोणतीही काटेरी फुले अर्पण केल्यास पूजेचा अपमान मानला जातो.

श्रावण महिन्यात भक्तिभावाने महादेवाची पूजा केली तर ती नक्कीच फलदायी ठरते. मात्र अज्ञानवश किंवा परंपरेच्या अतिरेकी आंधळेपणामुळे काही चुकीचे पदार्थ शिवलिंगावर चढवले गेले, तर त्याचा परिणाम उलट होऊ शकतो. त्यामुळे श्रद्धा असूनही नियमांचे भान राखणे गरजेचे आहे. योग्य फुले आणि पूजेची सामग्री वापरून, शुद्ध मनाने महादेवाची आराधना केल्यासच श्रावण सोमवारचे व्रत सार्थ ठरेल.