माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान महाविष्णू आणि माता लक

माघ पौर्णिमेला 'या' स्तोत्राचं करा पठण; आयुष्यात समृद्धी राहील, लक्ष्मी माता उजळवेल तुमचं भाग्य

माघ पौर्णिमा विशेष : धन-संपत्ती प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. मात्र, केवळ धन म्हणजेच लक्ष्मी किंवा लक्ष्मीचे रूप होय, असा अनेकांचा समज आहे. मात्र, असं नसून अन्नधान्य, जल, धन, आपल्याला परमेश्वराने दिलेलं शरीर आणि त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य, विद्या, शांती, तृप्ती, भक्ती, दया, क्षमा, मृदा म्हणजे माती आदी सर्व लक्ष्मी मातेचीच रुपं आहेत. या सर्व रुपांची आपल्याला आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी गरज असते. या सर्वांची प्राप्ती करून घेण्यासाठी शुद्ध विचार आणि आचरणासोबतच श्री लक्ष्मी मातेचे कनकधारा स्तोत्र नक्की म्हणावे. माघ पौर्णिमेला या स्तोत्राचे पठण करण्याला विशेष महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी माघ पौर्णिमेचा सण 12 फेब्रुवारी रोजी आहे.

हेही वाचा - शनीदेव आहेत मेहरबान! मग चिंता कसली.. पुढच्या दीड महिन्यात 'या' राशी होणार मालामाल

कनकधारा स्तोत्र म्हणजे सोने किंवा संपत्तीचा वर्षाव करणारा मंत्र आणि स्तोत्र, जो भगवान शिवाचे अवतार आद्यगुरु शंकराचार्य यांनी रचला होता. हे स्तोत्र शुक्रवार, पौर्णिमेच्या दिवशी, दिवाळीत आणि शक्य असल्यास नियमितपणे पठण करावे. कनकधारा स्तोत्राचे पठण करणाऱ्यांच्या घरावर देवी लक्ष्मीच्या कृपेचा वर्षाव होत राहतो.

कनकधारा स्तोत्राचे महत्त्व :  कनकधारा स्तोत्र हा देवी लक्ष्मीला संतुष्ट करणारा मंत्र आहे. असे म्हटले जाते की, हे पठण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कधीही कुठलीही उणीव किंवा कमतरता उरत नाही. देवी लक्ष्मी नियमितपणे आणि दर शुक्रवारी कनकधारा स्तोत्राचे पठण करणाऱ्याला समृद्ध बनवते. हे स्तोत्र आद्यगुरु शंकराचार्य यांनी देवी लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी एका विशेष परिस्थितीत रचले होते. जाणून घेऊ स्तोत्राची कथा..

कनकधारा स्तोत्राची कथा एकदा शंकराचार्य भिक्षा मागण्यासाठी भटकत असताना एका ब्राह्मणाच्या घरी पोहोचले. अशा प्रतिष्ठित पाहुण्याला पाहून ब्राह्मणाच्या पत्नीला स्वतःच्या परिस्थितीची लाज वाटू लागली. त्याच्याकडे दान म्हणून देण्यासाठी काहीही नव्हते. तिला तिच्या परिस्थितीवर रडू येऊ लागले. भरलेल्या डोळ्यांनीच तिने घरात ठेवलेले काही आवळे घेतले आणि वाळलेले आवळे त्या तपस्वीला भिक्षा म्हणून दिले. तिची अवस्था पाहून शंकराचार्यांना तिची दया आली. त्यांनी ताबडतोब ऐश्वर्य दायक, दशविध लक्ष्मी देणारी (दहा प्रकारची धन-संपत्ती देणारी), धनदात्री, अधिष्ठात्री देवता, दयाळू, प्रेमळ आणि नारायणाची पत्नी महालक्ष्मीला उद्देशून एक स्तोत्र रचले. या स्तोत्राचे पठण करून तिथे सोन्याचा पाऊस पडू लागला.  कनक म्हणजे सोने. यामुळे, या स्तोत्राचे नाव कनकधारा स्तोत्र असे पडले. सोन्याचा पाऊस पडताच हे स्तोत्र श्री कनकधारा स्तोत्र या नावाने प्रसिद्ध झाले. येथे संपूर्ण कनकधारा स्तोत्र दिलेले आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी याचे पठण नक्की करावे.

श्री कनकधारा स्तोत्रम्

अंगहरे: पुलकभूषण माश्रयन्ती भृगांगनैव मुकुलाभरणं तमालम। अंगीकृताखिल विभूतिरपांगलीला मांगल्यदास्तु मम मंगलदेवताया:।।

मुग्ध्या मुहुर्विदधती वदनै मुरारै: प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि। माला दृशोर्मधुकर विमहोत्पले या सा मै श्रियं दिशतु सागर सम्भवाया:।।

विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षमानन्द हेतु रधिकं मधुविद्विषोपि। ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्द्धमिन्दोवरोदर सहोदरमिन्दिराय:।।

आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दमानन्दकन्दम निमेषमनंगतन्त्रम्। आकेकर स्थित कनी निकपक्ष्म नेत्रं भूत्यै भवेन्मम भुजंगरायांगनाया:।।

बाह्यन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभै या हारावलीव हरि‍नीलमयी विभाति। कामप्रदा भगवतो पि कटाक्षमाला कल्याण भावहतु मे कमलालयाया:।।

कालाम्बुदालिललितोरसि कैटभारेर्धाराधरे स्फुरति या तडिदंगनेव्। मातु: समस्त जगतां महनीय मूर्तिभद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनाया:।।

प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्मांगल्य भाजि: मधुमायनि मन्मथेन। मध्यापतेत दिह मन्थर मीक्षणार्द्ध मन्दालसं च मकरालयकन्यकाया:।।

दद्याद दयानुपवनो द्रविणाम्बुधाराम स्मिभकिंचन विहंग शिशौ विषण्ण। दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं नारायण प्रणयिनी नयनाम्बुवाह:।।

इष्टा विशिष्टमतयो पि यथा ययार्द्रदृष्टया त्रिविष्टपपदं सुलभं लभंते। दृष्टि: प्रहूष्टकमलोदर दीप्ति रिष्टां पुष्टि कृषीष्ट मम पुष्कर विष्टराया:।।

गीर्देवतैति गरुड़ध्वज भामिनीति शाकम्भरीति शशिशेखर वल्लभेति। सृष्टि स्थिति प्रलय केलिषु संस्थितायै तस्यै ‍नमस्त्रि भुवनैक गुरोस्तरूण्यै ।।

श्रुत्यै नमोस्तु शुभकर्मफल प्रसूत्यै रत्यै नमोस्तु रमणीय गुणार्णवायै। शक्तयै नमोस्तु शतपात्र निकेतानायै पुष्टयै नमोस्तु पुरूषोत्तम वल्लभायै।।

नमोस्तु नालीक निभाननायै नमोस्तु दुग्धौदधि जन्म भूत्यै । नमोस्तु सोमामृत सोदरायै नमोस्तु नारायण वल्लभायै।।

सम्पतकराणि सकलेन्द्रिय नन्दानि साम्राज्यदान विभवानि सरोरूहाक्षि। त्व द्वंदनानि दुरिता हरणाद्यतानि मामेव मातर निशं कलयन्तु नान्यम्।।

यत्कटाक्षसमुपासना विधि: सेवकस्य कलार्थ सम्पद:। संतनोति वचनांगमानसंसत्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे।।

सरसिजनिलये सरोज हस्ते धवलमांशुकगन्धमाल्यशोभे। भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्।।

दग्धिस्तिमि: कनकुंभमुखा व सृष्टिस्वर्वाहिनी विमलचारू जल प्लुतांगीम। प्रातर्नमामि जगतां जननीमशेष लोकाधिनाथ गृहिणी ममृताब्धिपुत्रीम्।।

कमले कमलाक्षवल्लभे त्वं करुणापूरतरां गतैरपाड़ंगै:। अवलोकय माम किंचनानां प्रथमं पात्रमकृत्रिमं दयाया : ।।

स्तुवन्ति ये स्तुतिभिर भूमिरन्वहं त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम्। गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो भवन्ति ते बुधभाविताया:।।

हेही वाचा - या 5 राशींचे लोक असतात खूप उधळपट्टी करणारे! कधीही बचतीकडे लक्ष नसतं

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)