Rajnath Singh: भारताच्या प्रगतीवर बाहेरच्यांचा डोळा; संरक्षणमंत्र्यांची ट्रम्प यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
अलीकडेच रशियाकडून इंधन खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतावर 50 टक्के आयातशुल्क लावल्याची पार्श्वभूमी त्यांनी उपस्थित केली. त्यांच्या मते, जागतिक बाजारात भारतीय वस्तू महाग करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असून, त्यामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. 'आपल्या प्रगतीचा वेग आणि क्षमता काहींना डोळ्यात खुपत आहे, परंतु कोणतीही ताकद भारताचा हा विकास थांबवू शकणार नाही,' असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सिंह यांच्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणे, शुल्क दर आणि जागतिक राजकारण यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. भारताने स्वावलंबन आणि वेगवान आर्थिक वाढ कायम ठेवण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सुचवले. त्यांच्या भाषणाने केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला आणखी बळ मिळाले असून, जागतिक आर्थिक स्पर्धेत भारत स्वतःचे स्थान मजबूत ठेवण्यास कटिबद्ध असल्याचा संदेश गेला.