Wednesday, August 20, 2025 09:19:10 AM

पर्यावरण संवर्धनासाठी काशी विश्वनाथ ट्रस्टचा मोठा निर्णय; आजपासून मंदिर परिसरात प्लास्टिकवर पूर्ण बंदी

मंदिर परिसरात प्लास्टिकच्या वस्तूंवर पूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टच्या या निर्णयानुसार, भाविकांनी प्रसाद, पाणी किंवा इतर पूजा साहित्य प्लास्टिकमध्ये आणू नये.

पर्यावरण संवर्धनासाठी काशी विश्वनाथ ट्रस्टचा मोठा निर्णय आजपासून मंदिर परिसरात प्लास्टिकवर पूर्ण बंदी
Kashi Vishwanath Temple
Edited Image

Kashi Vishwanath Temple Plastic Ban: काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने पर्यावरण स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 10 ऑगस्टपासून मंदिर परिसरात प्लास्टिकच्या वस्तूंवर पूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी आधी श्रावण महिन्यापासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता पूर्णपणे प्लास्टिकमुक्त परिसरासाठी ही बंदी कडक करण्यात आली आहे.

मंदिर ट्रस्टच्या या निर्णयानुसार, भाविकांनी प्रसाद, पाणी किंवा इतर पूजा साहित्य प्लास्टिकमध्ये आणू नये. त्याऐवजी लहान लाकडी भांड्यांमध्ये प्रसाद घेण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ट्रस्टने स्पष्ट केले आहे की प्लास्टिकमध्ये काहीही वस्तू घेऊन येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रिजभूषण मिश्रा यांनी सांगितले की, 'मंदिर परिसरातील प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरण स्वच्छ ठेवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्लास्टिकवर बंदी घालणे अत्यंत आवश्यक आहे.' 

हेही वाचा -  PM Kisan Samman Nidhi Yojana: 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही PM किसान योजनेचा 21वा हप्ता; जाणून घ्या

या निर्णयाची रूपरेषा 6 जुलै रोजी वाराणसी विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समन्वय बैठकीत ठरवण्यात आली होती. या बैठकीत सर्व संबंधित पक्षांचा समावेश होता, ज्यामुळे पर्यावरणपूरक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. मिश्रा यांनी पुढे सांगितले की, आता फुले, दूध, आणि पूजा साहित्य प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक वस्तूंमध्ये आणले जातील.

हेही वाचा - बिहार निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; 334 पक्षांची नोंदणी रद्द

काशी विश्वनाथ मंदिर परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी ही बंदी एक आदर्श उदाहरण ठरणार आहे. पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या या उपक्रमामुळे भाविकांमध्येही जागरूकता वाढेल, अशी अपेक्षा ट्रस्टला आहे. यामुळे केवळ मंदिर परिसरच नाही तर संपूर्ण वाराणसी शहराचा पर्यावरणीय स्तर सुधारेल, अशी खात्री प्रशासनाला आहे.
 


सम्बन्धित सामग्री