International Passengers: केंद्रीय गृह मंत्रालयाने परदेशी नागरिकांसाठी भारतातील 37 विमानतळे, 34 बंदरे आणि 37 आंतरराष्ट्रीय सीमा बिंदूंवर इमिग्रेशन चौक्या स्थापन केल्या आहेत. यामुळे परदेशी नागरिक आता या सर्व ठिकाणांमार्गे देशात प्रवेश आणि निर्गमन करू शकतील. गृह मंत्रालयाने भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सहा रेल्वे स्थानकांनाही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी इमिग्रेशन चौक्या म्हणून घोषित केले आहे. ही घोषणा 1 सप्टेंबर 2025 रोजी इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऑर्डर अधिसूचित केल्यानंतर करण्यात आली.
विमानतळांद्वारे प्रवास
आता परदेशी प्रवासी दिल्ली, अहमदाबाद, लखनौ, अमृतसर, वाराणसी, बागडोगरा, बेंगळुरू, भुवनेश्वर, भोपाळ, कालिकत, चंदीगड, चेन्नई, कोचीन, कोइम्बतूर, गोवा, गया, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता, केरळ, मदुराई, मंगलोर, मुंबई, मोपा, नागपूर, पटना, पोर्ट ब्लेअर, पुणे, श्रीनगर, सुरत, त्रिची, तिरुवनंतपुरम, तिरुपती, विशाखापट्टणम आणि विजयवाडा विमानतळांमार्गे आगमन आणि निर्गमन करू शकतात.
हेही वाचा - Central Govt Schemes: आता 'अशा' प्रकारे बनवल्या जातील केंद्रीय योजना; मोदी सरकारचा मसुदा तयार, काय असेल प्रक्रिया?
बंदरांद्वारे प्रवास
दरम्यान, अलंग, अगाट्टी, मिनिकॉय, बेदी, भावनगर, कालिकत, चेन्नई, कोचीन, कुड्डालोर, धामरा, काकीनाडा, कोलकाता, कांडला, कृष्णा, कटूपट्टू, करीमगंज, कामराजर, कोल्लम, मांडवी, मुरमुगाव, मुंद्रा, मुंबई, न्यू मंगलोर, नागापट्टिनम, न्हावा शेवा, पारादीप, पोर्चुगंज, विशाखापट्टणम, वल्लारपदम, विझिंजम, धुबरी आणि पांडू हे बंदर परदेशी नागरिकांसाठी खुले आहेत.
हेही वाचा - Marathi Language Center: लंडनमध्ये उभारलं जाणार ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र’
आंतरराष्ट्रीय सीमेवरील प्रवेश बिंदू
याशिवाय, परदेशी नागरिक अटारी रोड, डेरा बाबा नानक, बनबासा, चांगराबंध, घोजाडंगा, हरिदासपूर, हिली, जायगाव, लालगोलाघाट, महदीपूर, फुलबारी, राधिकापूर, राणीगंज, गेडे, दलू, डवकी, आगरतळा, धलाईघाट, खोवाल, मुहुरीघाट, रागना, कैलाशहर, सबरूम, श्रीमंतपूर, गौरीफंटा, रुपैडिहा, सनौली, जोगबानी, रक्सौल, मोरेह, मिझोराम येथे इमिग्रेशन पॉइंट्स वापरून भारतात प्रवेश आणि निर्गमन करू शकतील.
रेल्वे स्थानकांद्वारे प्रवास
मुनाबाव, अटारी, गेडे, पेट्रापोल/चितपूर, हरिदासपूर आणि न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानकांमार्गे परदेशी नागरिक भारतात ये-जा करू शकतील. या निर्णयामुळे भारतात परदेशी नागरिकांचा प्रवेश अधिक सुलभ होणार असून, पर्यटन, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी ही पावले महत्त्वाची ठरतील.