डेहराडून: उत्तराखंडच्या शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांसोबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम लवकरच राज्यातील 17 हजार सरकारी शाळांमध्ये दिसून येईल. राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये भगवद्गीता आणि रामायण शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात शिक्षण विभागाची एक आढावा बैठक झाली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या संदर्भात निर्णय घेतला. आता लवकरच त्याचा परिणाम तेथील सरकारी शाळांमध्ये दिसून येईल.
एनसीईआरटीला निर्देश -
उत्तराखंडमधील शाळांच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचे काम एनसीईआरटीला देण्यात आले आहे. यासाठी शिक्षण विभागाने मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासोबत बैठकही घेतली आहे. या बैठकीतच एनसीईआरटीला अभ्यासक्रमात बदल करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 17 हजार सरकारी शाळांमध्ये भगवद्गीता आणि रामायणाचा नवीन अभ्यासक्रम ठेवण्यात येईल.
हेही वाचा - एअर इंडिया, अकासा, स्पाइसजेट.. कोणाकडे किती बोईंग विमाने आहेत? सर्वांच्या इंधन 'स्विच'ची तपासणी सुरू
दरम्यान, एनसीईआरटीने काल 'वीणा' नावाचे पुस्तकही प्रकाशित केले. त्यात गंगेच्या कथेचा धडाही देण्यात आला आहे. या पुस्तकात वाराणसी, पटना, कानपूर आणि हरिद्वार यासारख्या शहरांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात कुंभमेळ्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, एनसीईआरटीने इयत्ता 8 वी च्या नवीन सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात मुघलांचा इतिहास देखील सांगितला आहे.
हेही वाचा - Shubhanshu Shukla: 18 दिवसांच्या अंतराळ मोहिमेनंतर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची प्रतिक्रिया -
तथापी, राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये भगवद्गीता शिकवण्याच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री धामी म्हणाले, 'भगवद्गीता हा एक पवित्र ग्रंथ आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले ज्ञान आहे, जे काळजीपूर्वक वाचल्यास एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर उपयुक्त ठरते. आम्ही शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत निर्णय घेतला की राज्यातील सर्व शाळांमध्ये गीता शिकवली जाईल.'