Monday, September 01, 2025 06:55:40 AM

Weather Update: देशभरात तापमान 2-4 अंशांनी वाढणार! हवामान खात्याने दिला उष्णतेच्या लाटेचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी राजधानीसह अनेक राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. 6 किंवा 7 एप्रिलपर्यंत दिल्ली-एनसीआरमधील तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.

weather update देशभरात तापमान 2-4 अंशांनी वाढणार हवामान खात्याने दिला उष्णतेच्या लाटेचा इशारा
Heat Wave
Edited Image

Weather Update: देशभरात उन्हाळ्याच्या झळा अधिक तीव्र होताना जाणवत आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत जोरदार उष्ण वारे म्हणजेच उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. तथापी, दिल्लीत तीव्र उष्णतेच्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी राजधानीसह अनेक राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. 6 किंवा 7 एप्रिलपर्यंत दिल्ली-एनसीआरमधील तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील लोकांनाही कडक उन्हाचा सामना करावा लागेल. या भागात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या मते, एप्रिल ते जून दरम्यान भारतात सामान्यपेक्षा जास्त उष्णता असण्याची शक्यता आहे. या काळात सहसा तीव्र उष्णतेच्या लाटा असतात. या वर्षी उष्णता आणखी धोकादायक रूप धारण करू शकते.

जयपूर हवामान केंद्राच्या मते, राजस्थानमधील अनेक भागात कमाल तापमान 38 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. हे तापमान सामान्यपेक्षा 2 ते 4 अंशांनी जास्त आहे. शुक्रवारी बाडमेरमध्ये सर्वाधिक 42.4 अंश तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 4-5 दिवस हवामान कोरडे राहील. तापमानात आणखी 2 ते 4 अंशांनी वाढ होऊ शकते. पश्चिम, दक्षिण आणि पूर्व राजस्थानमध्ये 5 ते 6 एप्रिल दरम्यान तापमान 41 ते 44 अंशांपर्यंत पोहोचू शकते. यामुळे 6 ते 9 एप्रिल दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -  पंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान 'मित्र विभूषण' प्रदान; म्हणाले, ‘हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान'

वायव्य भारतातही उष्णतेच्या लाटेचा इशारा - 

भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, येत्या सहा दिवसांत वायव्य भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. यामध्ये दिल्ली, दक्षिण हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. या भागातील तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. उष्णतेच्या लाटेचा परिणाम विशेषतः मध्य, पूर्व आणि वायव्य भारतात अधिक असेल. देशात साधारणपणे 4 ते 7 दिवस उष्णतेच्या लाटा राहतात. परंतु यावेळी काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कालावधी 10 ते 11 दिवसांपर्यंत राहू शकतो.

हेही वाचा -  Heatwave Alert: वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा; दिल्लीत पारा 42 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

या राज्यात उष्णतेची लाट - 

राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा जास्त काळ टिकू शकतात. विशेषतः उत्तर प्रदेश (पूर्व भाग), झारखंड आणि ओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेचा परिणाम दीर्घकाळ टिकण्याची शक्यता आहे. 
 


सम्बन्धित सामग्री