Wednesday, August 20, 2025 09:32:53 AM

Asia Cup 2025: 'लगान' वसूल केल्यानंतर आता टीम इंडियाचं पुढचं मिशन काय? जाणून घ्या संपूर्ण क्रिकेट शेड्यूल

इंग्लंडविरुद्ध यश मिळवल्यानंतर टीम इंडिया आशिया कप आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. युवा खेळाडूंना मोठी संधी, शेड्यूलसह पुढील आव्हानांची तयारी सुरू.

asia cup 2025 लगान वसूल केल्यानंतर आता टीम इंडियाचं पुढचं मिशन काय जाणून घ्या संपूर्ण क्रिकेट शेड्यूल

Asia Cup 2025: भारतीय क्रिकेट संघाने नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडवर दमदार विजय मिळवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नव्या पिढीच्या खेळाडूंनी घेतलेली जबाबदारी आणि कर्णधार शुभमन गिलचं परिपक्व नेतृत्व यामुळे भारतीय संघाचं भविष्य उज्वल वाटू लागलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि रोहित शर्मा व विराट कोहलीच्या अनुपस्थितीतही टीम इंडियाने चांगली कामगिरी साकारली.

आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत भारतीय संघाच्या आगामी शेड्यूलकडे. इंग्लंड मालिकेनंतर भारताचं पुढील आव्हान आहे आशिया कप 2025, जो सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये पार पडणार आहे.

आशिया कप 2025 - युवा संघाला संधीयावेळी आशिया कपसाठी भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. रोहित आणि विराट यांच्यानंतर संघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो आहे. ही स्पर्धा T20 स्वरूपात होणार असून भारत गट टप्प्यात तीन सामन्यांत उतरणार आहे.

हेही वाचा: SUPERMEN from INDIA : सिराजचे 9 अन् प्रसिधचे 8 बळी, जयस्वालचं शतक; इंग्लंडला नमवत भारताचा रोमांचक विजय!

भारताचे गट टप्प्यातील सामने –

10 सप्टेंबर – विरुद्ध यूएई (दुबई)

14 सप्टेंबर – विरुद्ध पाकिस्तान (दुबई)

19 सप्टेंबर – विरुद्ध ओमान (अबू धाबी)

या सामन्यांमध्ये भारताची नवोदित खेळाडूंनी भरलेली टीम कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

वेस्ट इंडिज कसोटी मालिका – WTC चं नवं पर्व

ऑक्टोबर महिन्यात भारत पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये उतरतो आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार असून हे सामने अहमदाबाद आणि दिल्ली येथे होणार आहेत. ही मालिका भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या मोहिमेची सुरुवात ठरणार आहे.

या मालिकेसाठी रोहित शर्मा व इतर वरिष्ठ खेळाडू संघात पुनरागमन करू शकतात. कसोटी प्रकारातील मजबूत संघरचना आणि तरुण खेळाडूंची उत्साहपूर्ण कामगिरी ही भारतासाठी फायदेशीर ठरू शकते.

एकंदरीतच, टीम इंडिया सध्या संक्रमण काळातून जात असली तरी युवा खेळाडूंच्या आत्मविश्वासामुळे भारतीय संघ पुन्हा नव्या उंचीवर जाण्याची तयारी करत आहे. येणाऱ्या आशिया कप आणि कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघाची कामगिरी पाहणं रंजक ठरणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री