Monday, September 01, 2025 09:02:14 AM

Pakistan Train Hijack: आमचा लढा अजून संपलेला नाही! पाकिस्तानी सैन्याच्या हट्टीपणामुळे 214 ओलिस मारले गेले; BLA चा नवा दावा

बंडखोर बीएलएने म्हटलं आहे की, बीएलएने नेहमीच युद्धाच्या तत्त्वांनुसार व राष्ट्रीय कायद्यानुसार काम केले आहे, परंतु पाकिस्तानने आपल्या जवानांना वाचवण्याऐवजी युद्धासाठी इंधन म्हणून त्याचा वापर केला.

pakistan train hijack आमचा लढा अजून संपलेला नाही पाकिस्तानी सैन्याच्या हट्टीपणामुळे 214 ओलिस मारले गेले bla चा नवा दावा
Pakistan Train Hijack
Edited Image

Pakistan Train Hijack: पाकिस्तान ट्रेन अपहरण प्रकरणात बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने आपल्या नवीन दाव्याने खळबळ उडवून दिली आहे. बीएलएचे म्हटलं आहे की, त्यांनी पाकिस्तानी सैन्याला युद्धकैद्यांची देवाणघेवाण करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. परंतु पाकिस्तानने आपल्या हट्टीपणा आणि लष्करी अहंकार दाखवत केवळ गंभीर चर्चा टाळली नाही तर जमिनीवरील वास्तवाकडेही डोळेझाक केली. या हट्टीपणामुळे सर्व 214 ओलिसांची हत्या करण्यात आली. 

बंडखोर बीएलएने पुढे म्हटलं आहे की, बीएलएने नेहमीच युद्धाच्या तत्त्वांनुसार आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार काम केले आहे, परंतु पाकिस्तानने आपल्या जवानांना वाचवण्याऐवजी युद्धासाठी इंधन म्हणून त्याचा वापर करणे पसंत केले. शत्रूला या जिद्दीची किंमत 214 जणांच्या मृत्यूच्या स्वरूपात मोजावी लागली. 

हेही वाचा - 'अपहरण केलेली ट्रेन सोडवली' हे साफ खोटं! ओलिसांची सुटका झालीये तर फोटो दाखवा; पाकिस्तानी सैन्याला बलुच बंडखोरांचे आव्हान

बीएलए गटाकडे त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा नाही -   
 
तथापि, बीएलए गटाने त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा सादर केला नाही. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांनी म्हटलं आहे की, सैनिकांनी 33 अतिरेक्यांना ठार मारले आणि 354 अपहरणकर्त्यांना वाचवले. बीएलएने इतर कोणत्याही अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा कोणताही पुरावा नाही. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बीएलएवर अतिरेकी दावे केल्याचा आरोप केला.

हेही वाचा - Pakistan Train Hijack : रेस्क्यू ऑपरेशन संपल्यावर माजी पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्याचा 100 जवान मारले गेल्याचा दावा; आर्मीने सांगितले फक्त 4

पाकिस्तानी सैन्याने केलेले दावे खोटे; बीएलएचा आरोप  

दरम्यान, बीएलएने म्हटले आहे की, ही लढाई अजून संपलेली नाही पण ती अधिक तीव्र झाली आहे. बलुच स्वातंत्र्यसैनिक वेगवेगळ्या भागात हल्ला करून कब्जा करणाऱ्या सैन्यावर सतत हल्ला करत आहेत आणि शत्रू अजूनही त्यांच्या मारल्या गेलेल्या जवानांचे मृतदेह परत मिळविण्यासाठी संघर्ष करत आहे. प्रत्येक जाणाऱ्या क्षणाबरोबर, बीएलएची श्रेष्ठता अधिक स्पष्ट होत आहे. ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर बलुच लिबरेशन आर्मी ऑपरेशन दारा-ए-बोलानची सविस्तर माहिती माध्यमांना जाहीर करेल. लढाई अजूनही चालू आहे.
 


सम्बन्धित सामग्री