Wednesday, August 20, 2025 03:55:25 PM

Team India Win Champions Trophy 2025: टीम इंडियाने तिसऱ्यांदा जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी; न्यूझीलंडकडून घेतला 25 वर्षांचा बदला

भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला 4 गडी राखून पराभूत करून तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली.

team india win champions trophy 2025 टीम इंडियाने तिसऱ्यांदा जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी न्यूझीलंडकडून घेतला 25 वर्षांचा बदला
Team India Win Champions Trophy 2025
Edited image, Twitter

Team India Win Champions Trophy 2025: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला 4 गडी राखून पराभूत करून तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या जेतेपदाच्या सामन्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर, न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 49 षटकांत 6 गडी गमावून 254 धावा करून विजय मिळवला. भारताने 10 महिन्यांपूर्वी आयसीसी टी20 विश्वचषक जिंकला होता. रोहित आणि विराटसाठी ही चौथी आयसीसी ट्रॉफी आहे.

हेही वाचा - IND Vs NZ फायनलचा थरार! सामना किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येईल?

25 वर्षांनंतर भारताने घेतला न्यूझीलंडकडून बदला - 

चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकून, भारताने 25 वर्षांनंतर न्यूझीलंडकडून बदला घेतला. 25 वर्षांपूर्वी 2000 मध्ये, न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता.

भारताच्या विजयात कर्णधार रोहित शर्माची मोठी भूमिका -  

भारताच्या विजयात कर्णधार रोहित शर्माने मोठी भूमिका बजावली. त्याने 83 चेंडूंत 83 धावांचा सामना केला आणि 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 76 धावांची शानदार खेळी केली. भारताकडून शुभमन गिलने 31, श्रेयस अय्यरने 48, अक्षर पटेलने 29, हार्दिक पंड्या 18 आणि केएल राहुलने नाबाद 34 धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी एकत्र येऊन टीम इंडियाचा डाव सावरला आणि चौथ्या विकेटसाठी 75 चेंडूत 61 धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करण्यास मदत केली. 

हेही वाचा - Champions Trophy Final 2025: IND vs NZ CT 2025 फायनल बद्दल तुम्हाला माहित आहे?

तथापि, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन, तर रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीने 9 षटकांत 74 धावा देत एक विकेट घेतली.
 


सम्बन्धित सामग्री