Monday, March 24, 2025

ताजमहालमध्ये नेमकं कोणत्या कारणामुळे दिवे लावले जात नाहीत? जाणून घ्या

Editor Name: Jaimaharashtra News

ताजमहाल जगातील सातव्या आश्चर्यांपैकी एक आहे. पांढऱ्या संगमरवरीपासून बनवलेला ताजमहाल पाहण्यासाठी पर्यटक विविध ठिकाणाहून येतात.

ताजमहालचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित रहस्ये जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो.

मात्र कधी तुम्ही हा विचार केलात? नेमकं कोणत्या कारणांमुळे रात्रीच्या वेळी ताजमहालवर दिवे लावले जात नाही?

चला तर जाणून घेऊया सविस्तर.

पर्यटकांसाठी, ताजमहाल सकाळी 6:00 वाजता उघडला जातो आणि संध्याकाळी 6:30 वाजता त्याचे दरवाजे बंद केले जातात.

रात्रीच्या दरम्यान, दिवे लावले जात नाही कारण, येथे मोठ्या प्रमाणात कीटक आहेत, जे प्रकाशाकडे लवकर आकर्षित होतात .

अशा परिस्थितीत, जर ताजमहालच्या आत दिवे लावले, तर हे कीटक इथे येऊन घाण निर्माण करू शकतात, ज्यामुळे ताजमहालचे सौंदर्य बिघडू शकते.

त्यासोबतच, डागांच्या खुणा फरशा खराब करू शकतात. त्यामुळे ताजमहालमध्ये दिवे लावले जात नाहीत.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)