Mahashivratri 2025 : जर तुम्हालाही महाशिवरात्रीला किंवा कोणत्याही प्रसंगी भांग पिण्याची किंवा खाण्याची सवय असेल, तर त्यापूर्वी त्यापासून होणाऱ्या नुकसानांबद्दल जाणून घ्या. कारण त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत.
या वर्षी महाशिवरात्री बुधवारी 26 फेब्रुवारी 2025 ला साजरी होणार आहे. हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व आहे. या दिवशी, देवांचे देव महादेव यांची पूजा करणे विशेष फलदायी ठरते. असे म्हटले जाते की, जेव्हा भक्त महाशिवरात्रीला पूजा करतात आणि उपवास करतात तेव्हा भगवान शंकर प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित आशीर्वाद देतात.
भक्त भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात. काही ठिकाणी, या दिवशी शिवलिंगावर भांग, बेलपत्र आणि धोत्रा अर्पण केल्याने भोले बाबा लवकर प्रसन्न होतात, असे मानले जाते. अनेकजण महाशिवरात्रीला शिवाला भांग अर्पण केल्यानंतर ती सर्वांना वाटतात आणि स्वतःही सेवनही करतात. बरेच लोक त्यातील थोडेसेच घेतात, परंतु, काही लोक असे आहेत जे एकामागून एक अनेक प्याले भरून भांग/गांजा पितात. पण तुम्हाला माहिती आहे का की, असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. भांग पिण्याचे तोटे जाणून घेऊया.
हेही वाचा - Bone Cracking Sound : तरुणपणीच हाडांमधून कट-कट आवाज येऊ लागलाय? तुम्ही होऊ शकता 'या' आजाराचे बळी, वेळीच करा 'हे' उपाय
गांजा/भांगेचा मेंदूवर न भरून येणारा दुष्परिणाम
गांजाचे सेवन मेंदूच्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. यामुळे मेंदूला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. मेंदूची क्षमता कमकुवत होऊ शकते आणि विसरण्याची (विसराळूपणा) समस्या देखील उद्भवू शकते. एनसीबीआयवरील एका अभ्यासात असेही दिसून आले आहे की, गांजाचे जास्त सेवन केल्यानंतर सात दिवसांनीही सूक्ष्म संज्ञानात्मक कमतरता स्पष्टपण दिसतात. गांजाचे सेवन केल्यामुळे मेंदूच्या रचनेवर आणि कार्यावर कायमस्वरूपी दुष्परिणाम होतो.
स्मरणशक्तीवरही नकारात्मक परिणाम
गांजाचे सेवन केल्याने स्मरणशक्तीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच, दररोज गांजा सेवन करण्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ शकते.
चिंता आणि अस्वस्थता
जर तुम्ही पहिल्यांदाच गांजा सेवन करत असाल तर, त्यामुळे तीव्र चिंतेची मनस्थिती किंवा घाबरल्यासारख्या भावना होऊ शकतात. याव्यतिरिक्त, यामुळे चक्कर येणे, उलट्या होणे आणि मळमळ होऊ शकते.
अशक्तपणा
गांजा जास्त प्रमाणात सेवन केला तर शरीरात अशक्तपणा जाणवू लागतो. यामुळे शारीरिक आणि मानसिक कमकुवतपणा येऊ शकतो. याचा मानवी मनःस्थितीवर आणि विचारांवरही परिणाम होतो.
टेट्राहायड्रोकानाबिनॉल (THC) असलेला गांजा मूड, विचार आणि वास्तवाची समज यांमध्ये बदल घडवून आणू शकतात. शिवाय, गांजाचे सेवन केल्याने माणूस मानसिकदृष्ट्या आतून कमकुवत आणि विचारहीन होऊ शकतो. गांजा सेवनामुळे मेंदूवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा - Tiger Parenting : टायगर पेरेंटिंग म्हणजे काय? त्यामुळे काय नुकसान होऊ शकतं? तुमचं मूलही याचा बळी आहे का?
(अस्वीकरण : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)