Wednesday, August 20, 2025 09:35:03 AM

नेतेपदी निवडीनंतर देवभाऊचं पहिलं भाषण

'एक है तो सेफ है' हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. तर मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, असं देवेंद्र फडणवीस निवड झाल्यानंतर म्हणाले.

नेतेपदी निवडीनंतर देवभाऊचं पहिलं भाषण

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांनंतर सर्वांच्या नजरा मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार यावर लागल्या होत्या. आखेर, अफाट श्रमानंतर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी सर्वानुमते निवड केली. या सर्व निवड प्रक्रियेअंती आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे दरम्यान, फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले.  त्याचबरोबर एकमताने माझी विधिमंडळ गटनेतापदी निवड केली. यंदाची निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती. 'एक है तो सेफ है' हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. तर मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, असं देवेंद्र फडणवीस निवड झाल्यानंतर म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर काय म्हणाले देवाभाऊ ? 
1. गटनेता म्हणून माझी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार.... 
2. यंदाची विधानसभेची निवडणूक ही ऐतिहासिक होती. 
3.'एक है, तो सेफ है' हे या निवडणुकीच्या निकालानं पटवून दिलं. 
4 'मोदी है, तो मुमकीन है' माननीय मोदीजींचे मी आभार मानतो, की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवलं 
5.मोदींच्या नेतृत्वात विजयाची मालिका सुरू झाली. 
6.महाराष्ट्राच्या जनतेला ज्यांनी मतदान केलं आशिर्वाद दिले त्यांना साष्टांग दंडवत. 
7.  इथं मनानं उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार मानतो. 
8. माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं..
9. ज्या प्रक्रियेनं आपण निवडून येतो त्या संविधानाची 75 वर्षं पूर्ण होतायत म्हणून हे महत्वाचं आहे.
10. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीवर्षी मी त्यांना नमन करतो..
11. आपले सगळ्यांचे लाडके श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांना नमन करतो.
12. आपली प्राथमिकता आपण सुरू केलेली योजना आणि महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे नेण्याकरता आपण कार्यरत राहू...
13. 2019 साली जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता, दुर्दैवानं तो कौल हिसकावून घेत जनतेशी बेईमानी केली होती.
14. सुरूवातीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात आपल्या आमदांराना त्रास दिला गेला तरीही एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही...
15. आपल्याला कुणीतरी मोठं करावं म्हणून आपण राजकारणात आलो नाही...
16. लार्जर इंटरेस्टमधे आपण एकत्र काम करू...कधीतरी काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात, काही मनाविरूद्ध होतात तरीही लार्जर इंटरेस्टमधे आपण सगळ्याशी जुळवून घेऊ...


विधिमंडळात काय घडलं?
भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिलं. या निर्णयाला प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे यांसह इतरांनीही पाठिंबा दर्शवला. केंद्रीय निरीक्षक विजय रूपानी यांनी ही निवड अधिकृतरीत्या जाहीर केली.फडणवीस यांचं नाव घोषित होताच विधिमंडळात ‘देवाभाऊ’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या निवडीनंतर भाजपच्या राज्यातील कार्यालयांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.


सम्बन्धित सामग्री