मुंबई : आरटीओ कार्यालय, जकात नाका, चेकपोस्ट येथे अतिरिक्त मनुष्यबळ आकृतिबंधाची मिळण्यासाठी सुयोग्य अंमलबजावणी, महसूल विभागानुसार होणाऱ्या बदल्या अशा प्रमुख मागण्यांसाठी संपावर गेलेल्या आरटीओ राज्यभरातील कर्मचाऱ्यांमुळे आरटीओ कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. कार्यालयात कर्मचारी उपलब्ध नसल्याने एकही कच्चे आणि पक्के लायसन्सचे वितरण आणि वाहन नोंदणी झाली नाही. याचा फटका विविध कामांसाठी आरटीओमध्ये नागरिकांना बसला असून, त्यांचे प्रचंड हाल झाले. तसेच कामकाज ठप्प झाल्याने परिवहन विभागाचे सुमारे ५० कोटींचे नुकसानदेखील झाले.