Monday, September 01, 2025 02:03:49 PM

वाहनधारकांसाठी मोठी बातमी! नियमात होणार मोठे बदल

राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. जर या नियमांचे पालन केले नाही तर अशा व्यक्तींकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

वाहनधारकांसाठी मोठी बातमी नियमात  होणार मोठे बदल

महाराष्ट्र: वाहनधारकांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आता दंड भरावा लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने वाहनांच्या  दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. जर या नियमांचे पालन केले नाही तर अशा व्यक्तींकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्रातील हे वाहन सुरक्षा नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत वाहनांना 31 मार्च 2025 पर्यंत उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक असणार आहे. 1 एप्रिल 2025 पासून ज्या वाहनांवर ही नंबर प्लेट नसेल त्या वाहक चालकांवर 10,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

काय आहे नवीन नियम? 

1 एप्रिलपासून 10 हजार रुपयांचा दंड
जर वाहन चालकांनी आदेशाचे पालन केले नाही तर मोटार वाहन कायद्यांतर्गत 10,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. HSRP नसलेल्यांसाठी वाहनांना वाहन नोंदणी आणि पत्ता बदलणे यासारख्या मिळणाऱ्या सेवा देखील बंद केल्या जाणार आहे. HSRP उपक्रमाचा उद्देश वाहनांची सुरक्षा वाढवणे आहे. ज्यामुळे चोरीला गेलेली वाहने परत मिळवता येतील.

त्याचबरोबर हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याचा हा नियम राज्यभरात लागू होणार आहे. या नियमानुसार जवळपास 20 दशलक्षाहून अधिक वाहनांना ही नंबर प्लेट लावावी लागणार आहे. वाहन मालकांना सध्याच्या स्थितीत असलेली नंबर प्लेट बदलून हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावावी लागणार आहे.


 


सम्बन्धित सामग्री