Monday, September 15, 2025 02:38:10 AM

Chanakya Niti : या तीन मार्गांनी कमवलेले धन सर्व काही धुळीस मिळवते; आताच कानाला खडा लावा..

आचार्य चाणक्य यांची शिकवण प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी, अडचणींवर मात करण्यासाठी चाणक्यांनी काही प्रभावी उपाय सुचवले आहेत. यांना चाणक्यांची सूत्रे असंही म्हटलं जातं.

chanakya niti  या तीन मार्गांनी कमवलेले धन सर्व काही धुळीस मिळवते आताच कानाला खडा लावा

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सखोल विचार मांडले आहेत. राजकारण असो, अर्थशास्त्र असो वा सामाजिक जीवन असो, त्यांनी प्रत्येक विषयावर मार्गदर्शन केले आहे. विशेषतः धन (पैसा) मिळवण्याबाबत चाणक्यांनी स्पष्ट केले आहे की, जर ते योग्य आणि प्रामाणिक मार्गाने कमवले तर ते जीवनात प्रगती आणि आनंद आणते. पण, जर चुकीच्या आणि अनैतिक मार्गांनी कमवले तर तेच धन समृद्धीऐवजी दुर्दैव आणि गरिबीचे कारण बनते.

1. अनैतिक मार्गाने कमवलेले धन
चाणक्य नीतीनुसार, जे धन नियम-कायदे तोडून किंवा अनैतिक मार्गांनी मिळवले जाते, ते कधीही टिकत नाही. लाच घेणे, बेकायदेशीर मार्गांनी कमाई करणे किंवा दुसऱ्याचा हक्क मारून पैसा मिळवणे, यामुळे व्यक्ती हळूहळू गरीब होत जाते. अशा पैशात शांती किंवा स्थैर्य नसते. शेवटी, हेच धन व्यक्तीला मानसिक आणि सामाजिक दोन्ही स्तरांवर कमकुवत करते.

2. फसवणुकीने कमवलेले धन
जर एखादी व्यक्ती इतरांना फसवून किंवा दगा-फटका देऊन पैसा कमवत असेल, तर तेही कधीही चांगले फळ देत नाही. फसवणुकीने मिळवलेले पैसे नेहमीच मनावर एक ओझे बनून राहतात. यामुळे मानसिक अशांती निर्माण होते आणि जर ही फसवणूक समाजासमोर आली तर त्या व्यक्तीची मान-प्रतिष्ठाही धुळीला मिळते. अशा पैशातून ना समृद्धी मिळते, ना सन्मान, असे चाणक्य म्हणतात.

हेही वाचा - Chanakya Niti : हे 4 लोक घरात असतील तर जीवन बनेल मृत्यूची मगरमिठी! चाणक्य म्हणतात, तिथे मुळीच थांबू नका

3. चोरीने मिळवलेले धन
चोरी करणे हे समाज आणि धर्म दोन्हींच्या विरोधात मानले जाते. चाणक्य नीतीनुसार, चोरीने मिळवलेले पैसे कधीही टिकत नाहीत आणि आत्मिक समाधान देत नाहीत. अशा पैशांमुळे जीवनात सुखाऐवजी भीती आणि अपमान वाढतो. चोर व्यक्ती हळूहळू आपली सामाजिक ओळख आणि आर्थिक स्थिरता दोन्ही गमावून बसते.

4. चाणक्य यांचा श्लोक आणि त्याचा अर्थ
आचार्य चाणक्य म्हणतात, मेहनत आणि प्रामाणिकपणाने कमावलेले धनच टिकते. चाणक्य नीतीमध्ये एक श्लोक आहे.
अन्यायोपार्जितं द्रव्यं दश वर्षाणि तिष्ठति।
प्राप्ते एकादशे वर्षे समूलं च विनश्यति।।
त्याचा अर्थ असा आहे की, अन्याय, बेईमानी आणि चुकीच्या मार्गांनी कमावलेले धन जास्तीत जास्त दहा वर्षे टिकते. अकरावे वर्ष सुरू होताच ते धन पूर्णपणे नष्ट होते. म्हणजेच, अशा पैशातून कधीही कायमस्वरूपी समृद्धी मिळत नाही.

हेही वाचा - Chanakya Niti : या जीवन बरबाद करणाऱ्या सवयी लगेच सोडून द्या; नंतर पश्चाताप वाटून उपयोग नाही

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याचा दावा करत नाही.)


सम्बन्धित सामग्री