बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. या घटनेवर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता शरद पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे. देशमुख कुटुंबियांशी झालेल्या भेटीनंतर हत्येच्या सूत्राधाराचा शोध घेत नाहीत. तोवर स्वस्थ बसणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह निलेश लंके, राजेश टोपे, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे या नेत्यांनी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. ही घटना न पटणारी असल्याचे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
बीडमध्ये जे घडलं, त्याच्यात संतोष देशमुखचा संबंध नसताना त्याची हत्या करण्यात आली. कुणीतरी येऊन कुणाला तरी दमदाटी करून मारहाण केली. त्या घटनेची तक्रार आल्यावर त्यांची सरपंच या नात्याने चौकशी केली असता बाहेरून लोक येऊन व्यक्तिगत हल्ला करतो आणि त्याची हत्या करून जातो. हे अतिशय गंभीर आहे. या घटनेची नोंद राज्य आणि केंद्र सरकारने घ्यायला हवी असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : बीड प्रकरणात पोलिस अधिक्षकांची बदली होणार
या घटनेच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत. त्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा शब्द शरद पवार यांनी देशमुख कुटुंबियांना दिला आहे. दरम्यान यावेळी शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या दोन्ही मुलांची शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण करणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.