Wednesday, August 20, 2025 05:35:03 PM

IND vs ENG 5th Test : हा भारतीय गोलंदाज वेदनाशामक इंजेक्शन घेऊन खेळतोय..! शुभमन गिलशी संभाषण व्हायरल

भारत - इंग्लंडमधील 5वी कसोटी एका रोमांचक वळणावर आली आहे, आता हा सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. दरम्यान, गोलंदाज आकाश दीप वेदनाशामक इंजेक्शन घेऊन खेळत असल्याचे समोर आले आहे.

ind vs eng 5th test  हा भारतीय गोलंदाज वेदनाशामक इंजेक्शन घेऊन खेळतोय शुभमन गिलशी संभाषण व्हायरल

IND vs ENG 5th Test 2025: भारत विरुद्ध इंग्लंड 5 व्या कसोटीच्या चौथ्या दिवशी वेगवान गोलंदाज आकाश दीपने हॅरी ब्रूकची विकेट घेऊन भारताच्या विजयाची आशा उंचावली. दरम्यान, शुभमन गिल आणि आकाश दीप यांच्यातले रविवारी झालेले संभाषण व्हायरल झाले आहे. यावरून हे उघड झाले आहे की, आकाश इंजेक्शन घेतल्यानंतर खेळत आहे.
भारत आणि इंग्लंडमधील 5वी कसोटी एका रोमांचक वळणावर आली आहे, आता हा सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. चौथ्या दिवशी वेगवान गोलंदाज आकाश दीपने हॅरी ब्रूकची विकेट घेतली. यानंतर शुभमन गिलशी त्याचे रविवारचे संभाषण व्हायरल झाले. यावरून तो इंजेक्शन घेतल्यानंतर खेळत असल्याची बाब समोर झाली आहे.

इंग्लंडने 3 विकेट गमावल्यानंतर 300 धावांचा टप्पा ओलांडला होता, हॅरी ब्रूक आणि जो रूटच्या भागीदारीने सामना जवळपास एकतर्फी झुकवला. पण त्यानंतर आकाश दीपने ब्रूक (111) ला बाद केले, यावेळी इंग्लंडची धावसंख्या 301 धावा होती. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने जेकब बेथेल (5) आणि जो रूट (105) यांच्या विकेट घेत सामना रोमांचक स्थितीत नेला.

हेही वाचा - '...दूर राहण्यामुळेच किंमत कळते,' सायना-कश्यप पुन्हा एकत्र; नात्याला आणखी एक संधी देण्याची घोषणा

आकाश दीपला कधी दुखापत झाली?
पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी लंचच्या काही वेळापूर्वी, ब्रूकने स्ट्रेट ड्राइव्ह मारला. तो आकाश दीपच्या पायाला लागला. जर तो पुढे खेळला नसता तर, भारतीय गोलंदाजी कमकुवत झाली असती. यानंतर, शुभमन गिलचे त्याच्याशी झालेले संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले, ज्यामध्ये आकाश दीप इंजेक्शन घेतल्यानंतर खेळत असल्याचे उघड झाले.

व्हायरल झालेल्या संभाषणात गिल आकाशला म्हणत असल्याचे दिसत आहे, "तू इंजेक्शन घेतले का? त्याने वेदनाशामक इंजेक्शन घेतले असण्याची शक्यता आहे. यावरून त्याची खेळाबद्दलची जिद्द दिसून येते. यापूर्वी, ऋषभ पंत देखील चौथ्या कसोटीत पायाच्या बोटाला फ्रॅक्चर असूनही फलंदाजीसाठी आला होता.

आता भारताला जिंकण्यासाठी 4 विकेट्सची आवश्यकता आहे. तर, इंग्लंडला फक्त 35 धावांची आवश्यकता आहे. पण ते त्यांच्यासाठी फारसे सोपे असणार नाही. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या 7 षटकांत इंग्लंडने 2 विकेट्स गमावल्या आणि फक्त 9 धावा काढल्या. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा टिच्चून गोलंदाजी करत आहेत. त्यामुळे इंग्लंडला प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागत आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटीचा शेवटचा दिवस आज दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल आणि थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर केले जाईल.

हेही वाचा - तुटलेल्या माहीची साक्षी बनली आधार; जाणून घ्या धोनी आणि साक्षीची लव्हस्टोरी


सम्बन्धित सामग्री